हवामान खात्याने योग्य वेळी मच्छीमारांना कल्पना दिली असती तर मच्छिमारांची हानी टळली असती
नुकत्याच झालेल्या वादळामुळे दापोली तालुक्यातील हरणे बंदरात उभी असलेली नौका बुडाली होती हवामान खात्याने सात तारखेच्या वादळा बाबत मच्छिमारांना पूर्वकल्पना दिली असती तर मच्छिमारांनी आपल्या नौका आंजर्ले खाडीत सुरक्षितेसाठी नेल्या असत्या मात्र अशी कोणतीही कल्पना न दिल्याने मच्छीमारांचे नुकसान व हानी झाली असा आरोप हरणे बंदर मच्छीमार संघटनेचे सदस्य महेंद्र चोगले यांनी केला आहे
www.konkantoday.com