
रत्नागिरीत व्यापाऱ्यांचा जनता कर्फ्यू ला विरोध, बाजारपेठ सुरू राहणार
रत्नागिरी जिल्ह्यासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या
वाढत असल्याने तसेच बाजारपेठेतही अनेक व्यवसायिक व कामगार कोरोना बाधित आढळले आहेत त्यामुळे आज व्यापारी संघाचे अध्यक्ष उदय पेठे यांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली होती त्यामध्ये आपण होऊन जनता कर्फ्यू सुरू करायचा का या विषयावर चर्चा झाली मात्र बाजारपेठ बंद ठेवण्यात व्यापाऱ्यांनी विरोध केला मागील परिस्थितीमुळे सध्या व्यापार तोट्यात आहे त्यात आणखी बंद केल्यास मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागेल असे मत मांडण्यात आले ज्या व्यापाऱ्यांना स्वेच्छेने दुकाने बंद ठेवायचे असतील त्यांनी ठेवावीत मात्र जनता कर्फ्यू करू नये असे मत मांडले गेले त्यामुळे आता रत्नागिरी बाजारपेठ खुली राहणार आहे
www.konkantoday.com