नाकाबंदी उठल्याने गुन्हे वाढण्याची शक्यता नागरिकांनी सावधानता बाळगावी – पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांचे आवाहन
खेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सील करण्यात आलेल्या जिल्ह्याच्या सीमा आता मोकळ्या करण्यात आल्याने गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही पोलीस असल्याचे सांगून नागरिकांना लुबाडणे, अंगावरील दागिने खेचून पळ काढणे, रात्रीच्या काळोखाचा फायदा घेऊन घरफोड्या करणे अशा प्रकारचे गुन्हे घडण्याची दात शक्यता असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी तसेच गावात एखादी अनोळखी व्यक्ती डिस्टली तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन खेडच्या पोलीस निरीक्षक सौ सुवर्णा पत्की यांनी केले आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी पोलीस स्थानकात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या होत्या. पोलीस, महसूल आणि शिक्षण विभागाचे कर्मचारी दिवसरात्र चेकनाक्याकर कार्यरत होते त्यामुळे चोऱ्या, लूटमार, घरफोड्या या सारख्या गुन्ह्यांना आळा बसला होता मात्र आता शासनाच्या निर्देशानुसार राज्यभरातील सीमा मोकळ्या करण्यात आल्या आहेत. चेकपोस्ट वरून पोलीस हटविण्यात आल्याने परजिल्ह्यातील लोक जिल्ह्यात येऊन चोऱ्या, लूटमार, घरफोड्या करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही पोलीस आहोत, पुढे मारामारी झाली आहे तुमचे दागिने आमच्याकडे ठेवायला द्या, असे सांगून नागरिकांना लुटण्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारत येत नाही.
अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत म्हणून पोलीस रात्रदिवस आपले कर्तव्य बजावत आहेतच परंतु नागरिकांनीही सावधानता बाळगण्याची गरज आहे. गावात एकही अनोळखी व्यक्ती संशयास्पद रित्या फिरत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
www.konkantoday.com