जिल्ह्यात पेट्रोलपंप चालकांकडून खरेदी बंद, पेट्रोलपंप मात्र सुरू राहिल्याने गैरसोय टळली

रत्नागिरी : राज्यातल्या सुमारे 90 टक्के पेट्रोलपंप चालकांनी मंगळवारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल खरेदी केले नाही. असे असले तरी पेट्रोलपंप दिवसभर सुरू होते. त्यामुळे जिल्ह्यात वाहनचालकांची गैरसोय झाली नाही. देशभरातील पेट्रोलपंप मालक संघटीत असल्याचे  यातून दिसून आल्याचे  फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकारांना सांगितले. पेट्रोल डिलर्सचे गेल्या पाच महिन्यांपासून डिलर मार्जिन सुधारलेले नाही. शासन व ऑईल कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार दर सहा महिन्यांनी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशकांशी निगडित केले असतानाही याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे 31 मे रोजी तेल कंपन्यांकडून इंधन खरेदी बंद आंदोलन करण्यात आले. राज्यातील 90 टक्के पेट्रोलपंप या आंदोलनात सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button