
गणपती स्पेशल ट्रेनना पहिल्या दिवशी तरी चाकरमान्यांचा प्रतिसाद नाही
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने 162 ट्रेन सोडण्याचं नियोजन केले आहे. यातील काही ट्रेन ह्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रत्नागिरीला जाणारी पहिली ट्रेन रात्री साडे आठ वाजता सुटली. या पूर्ण रेल्वेत फक्त 6 प्रवासी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बसले तर ठाणे आणि पनवेल येथून 25 प्रवाशांनीच आरक्षण केले होते. 18 डब्यांच्या या गाडीत काल फक्त 30 प्रवाशीच होते या ट्रेन्सला सध्यातरी अत्यल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे
www.konkantoday.com