नाणार रिफायनरी स्थानिकांना नकोय, दलालांना हवीय -खासदार विनायक राऊत

नाणार रिफायनरी संदर्भात काहींच्या पोटातील जठाराग्नी आता वळवळायला लागला आहे असे वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केले आहे
याचे कारण 220 गुजराती भूमााफियांनी 2200 एकर जमिनी घेतल्या. त्याची दलाली या जठारांनी केली ती आता नष्ट झाली आहे. त्यांना कोकणच्या हीताची काळजी नसून दलालांची काळजी आहे. रिफायनरीकरीता राजापूर व गिर्ये रामेश्वर या भागात रिफायनरीसाठ ज्या जमीनी खरेदी केल्या आहेत त्या सर्व जमिनीच्या खरादी-विक्रीचे व्यवहार रद्द करण्याची मागणी मी स्वत: केलेली आहे. त्यामुळे भविष्यात नाणार रिफायनरी हा विषय संपला आहे. आठ दिवसांपूर्वी मी त्या भागाला भेट दिली तेव्हाही स्थानिकांनी रिफायनरीला विरोध केला आहे. रिफायनरी ही स्थानिकांना नको तर दलाली करणाऱ्यांना हवी आहे. त्यामुळे दलालांच्या दबावाला बळी पडणारे सरकार नाही असे राऊत यांनी सांगितले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button