
कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे कोकण रेल्वेने गावी जायचे स्वप्न सध्या अधांतरी
कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे कोकण रेल्वेने गावी जायचे स्वप्न सध्या अधांतरी आहे. राज्य सरकारच्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालयाने 11 ऑगस्ट पासून कोकणात विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र काल रात्रीपर्यंत राज्य सरकारकडून कोणतेही अंतिम आदेश न आल्याने अखेर या गाड्या न सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.मात्र 7 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला एक पत्र लिहिले आणि त्यात कोकणात जाण्यासाठी गणपती स्पेशल गाड्या सोडाव्यात अशी विनंती केली. ही बातमी आल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या शहरातील चाकरमानी गावी जाण्यासाठी तयारीला लागले होते. तिकीट काढण्यासाठी पैसे जमा करत होते. मात्र त्यांच्या या सर्व तयारीवर राज्य सरकारनेच विरजण टाकले आहे.
राज्य सरकारने ही विनंती केल्यानंतर मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने विशेष एक्सप्रेस गाड्यांचे नियोजन केले होते. हे नियोजन रेल्वे बोर्डाला पाठवण्यात आले. रेल्वे बोर्डाने देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. अकरा तारखेपासून या गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रवासी जे तिकीट काढतील ते तिकीट म्हणजे त्यांचा ई पास असणार होता.
मात्र राज्य सरकार कडून कोणत्याही प्रकारचे अंतिम आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना प्राप्त झाले नाहीत.
www.konkantoday.com