
विकास आराखड्याला कात्री लावल्यामुळे विकासासाठी अवघे ५३ कोटी जिल्हा प्रशासनाच्या हाती
कोरोना महामारीने जिल्हा नियोजन समितीचा आर्थिक ताळेबंद पुरता कोलमडला आहे. २११ कोटींचा विकास आराखड्याला कात्री लावल्यामुळे विकासासाठी अवघे ५३ कोटी जिल्हा प्रशासनाच्या हाती उरले आहेत. या परिस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी (ता. १४) पालकमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या तोकड्या निधीचे विकासकामांसाठी वाटप करताना प्रशासनाची कसरत होणार आहे.
ही बैठक १४ ऑगस्टला दुपारी ३ वाजता येथील अल्पबचत सभागृहात होणार आहे.
www.konkantoday.com




