चिपळूण येथील रिक्षा व्यावसायिकांचे पालकमंत्र्यांना निवेदन
प्रवासी मिळत नसल्याने चिपळूण येथील रिक्षा व्यावसायिक अडचणीत आले आहेत
कोरोना पार्श्वभूमीवर रिक्षा व्यवसायासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे व्यावसायिकांकडून पालन केले जात आहे. मात्र व्यवसाय करताना प्रवाशांअभावी धंदाच होत नसल्याने व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांचा जगण्याचा प्रश्न बिकट झाल्याने शासनाने रिक्षा व्यावसायिकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी संघर्ष रत्न रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी परिवहन मंत्री ना. अनिल परब व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
www.konkantoday.com