रत्नागिरीत डिफेन्स सिटी – पण नौदल तळ नाही?*📰 माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचं संरक्षण मंत्रालयाला पत्र

रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद औद्योगिक क्षेत्रात सुमारे ₹10,000 कोटींच्या गुंतवणुकीसह Dhirubhai Ambani Defence City (DADC) प्रकल्प प्रस्तावित आहे. Reliance Group आणि जर्मन कंपनी Rheinmetall यांच्यातील भागीदारीतून हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

या भव्य प्रकल्पात दरवर्षी:🔹 200,000

आर्टिलरी शेल्स🔹 10,000 टन स्फोटके

🔹 2,000 टन प्रोपेलंट्स🔹

तोफांचे दारुगोळे, लष्करी सामूग्री व यंत्रणा तयार केली जाणार आहे. पण रत्नागिरीत नौदल तळ कुठे?रत्नागिरी कोकण किनारपट्टीवरील महत्त्वाचे शहर असून, ही जागा भौगोलिकदृष्ट्या खुल्या आक्रमणाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याचे आढळते.

🔸 येथे सध्या एक कोस्ट गार्ड स्टेशन आहे, मात्र ते फक्त शोध, बचाव व निरीक्षण कार्यापुरते मर्यादित असल्याची माहिती आहे, युद्धजन्य परिस्थितीत तात्काळ कारवाई करणारा नौदल तळ अजून अस्तित्वात नाही.

लेबनॉन मधील Beirut स्फोटाचा धडा घ्या!📍 २०२० मध्ये बेरूत बंदरावर २,७५० टन अमोनियम नायट्रेट साठवले गेले होते, आणि त्याचा स्फोट होऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले, हजारो जखमी झाले आणि पूर्ण शहर हादरले.

💥 यावरून स्पष्ट होते की स्फोटक व्यवसायातून संभाव्य विनाश किती भयावह असू शकतो. स्थानिक सत्ताधाऱ्यांनी अशा दुर्घटनांपासून शिकणं गरजेचं आहे.

मिलिंद कीर यांचे मुद्दे:माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि R&AW प्रमुखांना पत्र लिहिले असून, त्यात त्यांनी पुढील बाबी अधोरेखित केल्या आहेत:1️⃣ राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते?:स्फोटक आणि युद्धसामग्री उत्पादन खुले किनारी भागात करणे हे लष्करी दृष्टीने अयोग्य असल्याचे दिसते.2️⃣ भारतीय धोरण आणि पॅटर्न:४१ पैकी ३४ संरक्षण प्रकल्प अंतर्भागात भागात; किनाऱ्यावर फक्त असेंब्ली/वाहन कारखाने आहेत.

3️⃣ जागतिक उदाहरणे:🔹 चीन – “थर्ड फ्रंट”

🔹 रशिया – WWII मध्ये उद्योग सायबेरिया आणि युराल्सला

🔹 ब्रिटन – शॅडो फॅक्टरी स्कीम मुळे शस्त्र कारखाने देशाच्या अंतर्गत भागात स्थलांतरित केले गेले होते.

🔹 अमेरिका – मॅनहॅटन प्रोजेक्ट: न्यू मेक्सिको अंतर्भागात असलेले केंद्रे.

🔹 भारत – इंग्रजांनी शस्त्र कारखाना तटावर नव्हे तर अंतर्गत भागात, पुण्यात खडकीला उभारला होता.

4️⃣ नौदल तळाची आवश्यकता:जर प्रकल्प रत्नागिरीतच राहणार असेल, तर नौदल तळ तातडीने उभारावा.

पारदर्शकतेची मागणी:🔎 प्रकल्पासंदर्भातील संदर्भोय धोरणात्मक निर्णय सार्वजनिक करण्याची मागणी.

⚖️ “हा प्रकल्प आर्थिक नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत आहे. म्हणून शासनाने फार काळजीपूर्वक निर्णय घ्यावे” – मिलिंद कीर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button