*लोकसभेस मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य -उदय सामंत *

रत्नागिरी:- लोकसभेच्या त्या त्या जागेवर प्रत्येक पत्र आपला दावा सांगणार आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा करण्याचा प्रश्‍नच नसल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे सामंत यांनी म्हटले आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा आमच्या शिवसेनेच्या हक्काची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी बोलताना म्हटले. ज्या ठिकाणी जे खासदार आहेत तेच त्या मतदार संघातील जागेवर निवडणूक लढवतो. आता आमच्याबरोबर जे खासदार आलेत आणि तिकडे जे उरले आहेत, त्यांच्या जागाही आम्हीच लढवल्या असल्याचे सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेचा कोणता निर्णय घ्यायचा, याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असेही सामंत यांनी गुरूवारी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button