
निसर्ग चक्रीवादळामुळे पुर्णत: नष्ट झालेल्या सुपारी व नारळाच्या झाडांना वाढीव दराने मदत
निसर्ग चक्रीवादळामुळे पुर्णत: नष्ट झालेल्या सुपारी व नारळाच्या झाडांना विशेष बाब म्हणून प्रति झाडाप्रमाणे वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड व रत्नागिरी जिल्हयात नुकसान झालेल्या बहुवार्षिक पिकांपैकी सुपारी व नारळाच्या झाडांना प्रति हेक्टरी रू ५० हजार या दराने मदत देण्याऐवजी पुर्णत: नष्ट झालेल्या सुपारी व नारळाच्या झाडांना प्रति झाड प्रमाणे खालील दराने मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सुपारी – रू ५० संपूर्ण नष्ट झालेल्या प्रति झाडासाठी नारळ – रू. २५० संपूर्ण नष्ट झालेल्या प्रति झाडासाठी वरील दराने मदत देण्यासाठी होणारा संपुर्ण खर्च राज्य शासनाच्या निधीमधून करण्यास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
www.konkantoday.com