
राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली
राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी (२२ जुलै) पार पडला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही शपथ घेतली. मात्र, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिली. त्यावरून सभापती नायडू यांनी त्यांना समज दिली. या मुद्यावरून राजकीय वादविवाद सुरू असून, आता स्वतः उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे.या प्रकरणावर आता स्वतः राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विट करून भूमिका मांडली आहे. “मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांचा खंदा प्रशंसक आहे. तसेच देवी भवानीचा उपासक आहे. शपथ घेताना कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत, याची परंपरेनुसार सभासदांना आठवण करून दिली. यात अजिबात अनादर केलेला नाही,” असं व्यंकय्या नायडू यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. उपराष्ट्रपतींनी यावर भूमिका मांडल्यामुळे या वादावर पडदा पडला आहे
www.konkantoday.com