पुष्पवृष्टी करत मावळते पोलिस अधीक्षक डॉ. गर्ग यांना निरोप

रत्नागिरी : मावळते पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दोन वर्षांच्या सेवेच्या काळात जिल्ह्यासाठी महत्त्वाचे काम केले. विविध उपक्रम राबविताना त्यांनी चांगली माणसे उभी करण्याचे काम केले आहे. यापुढील काळात सर्वांनी आपण जनतेच्या सेवेसाठी आहोत, हा दृष्टिकोन ठेवून काम करावे, असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्या निरोप समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, प्रभारी जिल्हा पोलीस उपअधीक्षक मारुती जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरिक्षक विनित चौधरी, हेमंत कुमार शहा यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. गर्ग यांनी आपल्या मनोगतात जिल्हावासियांचे आभार मानले. पोलीस अधीक्षक म्हणून पहिलीच नियुक्ती होती. अधीक्षक म्हणूण नेमके काय करायचे याची माहिती नव्हती. येथे आल्यानंतर सोबतच्या कर्मचार्‍यांसह कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांनी बरीच माहिती मला दिली. त्या माहितीचा काम करताना खूप फायदा झाला. विविध उपक्रम राबविताना काही अधिकार्‍यांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळे विविध उपक्रम पूर्ण होऊ शकले.  सागरी सुरक्षा भक्कम करण्यावर आपला  भर होता. काही प्रमाणात त्याला यश आले आहे.  शेवटी फुलांनी सजवलेल्या गाडीत गर्ग कुटुंबियांना बसवून पुष्पवृष्टी करत पोलीस अधिकार्‍यांनी डॉ. गर्ग यांना  निरोप दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button