कृषीजन्य उत्पादीत आधारित उद्योगांचे कर्ज माफ करावे, समविचारी मंचची मागणी

जिल्ह्यात अन्य उद्योग धंदे नाहीत रोजगार मुलक साधनांची कमतरता आहे.या स्थितीत कोकणातील अनेक नागरिक कृषीजन्य उत्पादीत आधारांवर लहान मोठे व्यवसाय करतात यात असंख्य लोक घरगुती व्यवसाय करुन उपजिविका चालवतात.यातील अनेकांनी वित्तीय संस्थांचे कर्ज घेतलेले आहे. मार्च महिन्यापासून लॉकडाऊन ला सुरवात झाली त्यामुळे घरगुती स्वरुपात साठवण आणि उन्हे दाखवून वाळलेले पदार्थ तयार करण्यात अडचणी आल्या परिणामी लहान स्वरुपात ज्यांनी कर्ज घेतले ते व्यवसायिक अडचणीत आली आहेत.नैसर्गिक संकटाचा विचार करुन या लहान व्यवसायिकांची कर्जे माफ करावीत अशी मागणी समविचारी मंचच्या वतीने करण्यात आली आहे.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button