जिल्हयात बरे झालेल्यांची काेराेना रुग्णाची संख्या आता 561वर पाेहाेचली

रत्नागिरी दि. 11 (जिमाका): काल सायंकाळपासून जिल्ह्यात एकूण 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून  एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 851 असून 15 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.  बरे झालेल्यांची संख्या आता 561 झाली आहे.   खेड तालुक्यातील कुंभाड येथील एका 70 वर्षीय महिला रुग्णाचा 08 जुलै 2020 रोजी  मृत्यू झाला होता सदर मृत रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने  मृताची संख्या आता 30 झाली आहे. 
                       आज बरे झालेल्यांमध्ये 3 घरडा 1 कामथे, 11 रत्नागिरी व 1 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत.

सायंकाळची स्थिती
एकूण पॉझिटिव्ह – 851
बरे झालेले  – 561
मृत्यू  – 30
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 287
 पैकी 09 रुग्ण होम आयसोलेशन,
4 रुग्ण इतर जिल्हयात उपचारासाठी गेले
 
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
            जिल्ह्यात सध्या 75 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 22 गावांमध्ये,  दापोली मध्ये 8 गावांमध्ये, खेड मध्ये 14 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 20 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 5 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
 
संस्थात्मक विलगीकरण
            संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी –  53, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी –  1,  उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 10,  उपजिल्हा रुग्णालय, कळबणी – 3, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 7, ग्रामीण रुग्णालय गुहागर-3,  केकेव्ही, दापोली – 5 असे एकूण 82 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
 
होम क्वॉरंटाईन
          मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून  आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या  14  हजार  329  इतकी आहे.
  10 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
            जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 11 हजार 942  नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 11 हजार 664 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 851 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 10 हजार 778 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 278 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.   278 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.  
                    परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि.  10 जुलै 2020 अखेर एकूण 1 लाख 75 हजार 613 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 92 हजार 936 आहे.  
          होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक,  नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
www.konkantoday.com
          

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button