प्रशासनाचे नियम फाट्यावर मारून काही ठिकाणी दुकाने उघडी ,जिल्ह्यात सर्वत्र एकच धोरणात्मक निर्णय जाहीर करण्याची मागणी

प्रशासनाने लॉकडाऊन केले असताना देखील रत्नागिरी शहरातील काही भागात दुकानदाराने अर्धे शटर उघडून आपला व्यवसाय सुरू केला आहे जे लोक प्रामाणिकपणे नियम पाळीत आहेत ते मात्र प्रशासनाच्या नियमाप्रमाणे दुकाने बंद करून आहेत.मात्र अशा प्रकारे प्रशासनाचे नियम फाटय़ावर मारून अर्धवट दुकाने उघडून व्यवसाय करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसत आहे रत्नागिरी जिल्ह्यात बाजारपेठ एक दिवस आड उघडण्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात येत असल्याचे कळत आहे मात्र यांचा व्यापाऱ्यांना फायदा होणार नाही यापेक्षा वेळेचे बंधन घालून दररोज दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे तसेच हा निर्णय प्रशासनाच्या प्रमुखांनी घेणे आवश्यक आहे जिल्ह्यात प्रत्येक प्रांतांकडे निर्णय सोपवल्यास प्रत्येक ठिकाणी वेग वेगळे निर्णय होऊ शकतात यापेक्षा जिल्हा प्रशासनाने एक धोरणात्मक निर्णय जाहीर करावा अशी सगळ्यांची मागणी आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button