उत्तर प्रदेशहून खेर्डीत आलेल्या ४७ कामगारांना परत पाठवा -गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई

चिपळूण तालुक्यातील खेर्डी एमआयडीसीतील थ्री एम पेपर मिल कंपनीने उत्तर प्रदेशवरून आणलेल्या ४७ कामगारांना पुन्हा उत्तर प्रदेशला पाठवा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी काल बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत हा विषय गृहराज्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिला. तसेच गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी करणारे दिलेले निवेदनही आमदार साळवी यांनी गृहराज्यमंत्री देसाई यांच्याकडे दिले. त्यावर ना. देसाई यांनी या ४७ कामगारांना परत पाठवण्याच्या व या प्रकरणात सखोल चौकशी करण्याच्या सूचना केल्या
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button