महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार केंद्र सरकारने निधी दिला नाही असा खोटा प्रचार करते-माजी आमदार डॉ. विनय नातू

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेपर्यंत विविध योजनांच्या माध्यमांतून २८ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम पोचविली आहे. याची तपशीलवार माहिती जनतेला होण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाशित आत्मनिर्भर भारत ही पुस्तिका प्रकाशीत केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही पुस्तिका प्रत्येक मतदारापर्यंत पोचवावी. असे आवाहन भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातूंनी केले आहे.
भाजपतर्फे आत्मनिर्भर भारत या डिजिटल बुकाचा प्रसाराची मोहिम राबविली जात आहे. यासंदर्भात संवाद साधताना भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातू म्हणाले की, सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार केंद्र सरकारने निधी दिला नाही असा खोटा प्रचार करत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button