भाटे किनाऱ्यावर अचानक भरतीमुळे लाटात अडकलेल्या दांपत्याची दोघा मच्छी मार तरुणानी जीवाची बाजी लावून केली सुटका.

समुद्र पाहिला की अनेकांना त्याचा मोह पडतोच रत्नागिरी शहरा नजीक भाट्ये समुद्रात समुद्रासोबत खेळण्याचा आनंद घेत असता अचानक लाटाने वेढले गेल्याने तरुण-तरुणीच्या प्रकरण अंगाशी आले होते मात्र दोन मच्छीमर आणि धाव घेतल्याने त्यांची या प्रसंगातून सुटका झाली भाट्ये समुद्रात कोहिनूर पॉईंटच्या खालच्या बाजूला दाम्पत्य गेले. मात्र येण्यासाठी वेळ झाला आणि समुद्राला भरती आली. भरतीमुळे समुद्र खवळला आणि मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळू लागल्या आणि बाहेरून आलेले हे दाम्पत्य या अजस्त्र लाटांमध्ये अडकले.

जीवघेण्या प्रसंगात काय करावे असे असताना या दाम्पत्याने शहर पोलिसांकडे संपर्क साधला. मात्र अजस्त्र लाटांमध्ये या दाम्पत्याला वाचवण्यात अडचणी येत होत्या. याचवेळी येथे मासेमारी करणारे तरुण बुरहान मजगावकर आणि सुभान बुडये या दाम्पत्यासाठी देवदूत ठरले. जीवाची बाजी लावत या दोघा तरुणांनी अजस्त्र लाटांमध्ये अडकलेल्या या दाम्पत्याला सुखरूप बाहेर काढले. जीवाची सुटका होताच दोघा दाम्पत्याने दोघा तरुणांचे अक्षरशः पाय धरत आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button