फक्त शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता शेतकर्‍यांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे -माजी आ. चंद्रकांत मोकल

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी व इतर फळझाडांची प्रचंड हानी झालेली असून विशेषतः रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यात समुद्रकिनारी असणार्‍या सर्व बागा उदध्वस्त झालेल्या आहेत. पुन्हा कोकण निसर्ग संपन्न व समृद्ध करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल यांनी केले आहे.
शासनाचे मंत्री निरनिराळ्या ठिकाणी शेतकर्‍यांना भेट देवून सांत्वन करून गेलेले असून शेतकर्‍यांनी शासनाकडून खूप काही मदत येईल व आपण उभे राहू अशी आशा करू नये असा सल्ला दापोलीचे माजी आमदार, पर्यटन व कृषि क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर चंद्रकांत मोकल यांनी देतानाच आपण आपल्याच पायावर उभे रहावयाचे आहे असे सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button