रत्नागिरीत तरुणावर वार करणाऱ्या एकाला पकडले ,३ फरार

रत्नागिरी :- नमाज पडून घरी परतणाऱ्या तरुणावर चौघांनी खून हल्ला केल्याची घटना शहरातील ओसवालनगर परिसरात शुक्रवारी दुपारी घडली . पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून अन्य तिघांचा शोध जारी आहे . पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तौसिफ गुहागरकर हा आज दुपारी नमाज पडून झाल्यावर घरी परतत होता . दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तौसिफला ओसवालनगर परिसरात चौघांच्या टोळक्याने गाठले. चौघा हल्लेखोरांनी तौसिफवर मागून येत हल्ला केला . अशफाक पटेल आणि तिघांनी तौसिफच्या पाठीवर , पोटावर धारदार शश्त्राने वार केले . तीन ते चार वार करुन हल्लेखोर पळाले . हल्ल्यानंतर तौसिफ गुहागरकर रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यात कोसळला . परिसरातील नागरिकांनी जखमी तौसिफला खासगी रुग्णालयात दाखल केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button