
१० लाख रुपये खर्चुन बांधण्यात आलेली विहीर पहिल्याच पावसात कोसळली
गुहागर तालुक्यातील चिखली येथे ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत १० लाख रुपये खर्च करून बांधलेली विहीर पहिल्याच पावसात कोसळल्याची घटना घडली. विहिरीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुहागर-चिपळूण मार्गावरील चिखली मांडवकरवाडी व बौद्धवाडी येथे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीचे काम करण्यात आले. दरम्यान १० लाख रुपये खर्च करून बांधलेली विहिर पहिल्याच पावसात कोसळली, त्यामुळे या कामाच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
www.konkantoday.com