राज्यात मंगळवारी दिवसभरात ३ हजार २१४ रुग्णांचे निदान

राज्यात मंगळवारी दिवसभरात ३ हजार २१४ रुग्णांचे निदान झाले तर ७५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या १ लाख ३९ हजार १० झाली असून मृतांचा आकडा ६ हजार ५३१ वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.०९ टक्के झाले असून मृत्यूदर ४.६९ टक्के आहे. सध्या राज्यात ६२ हजार ८३३ सक्रिय रुग्ण आहेत.
सध्या मुंबईत ६८ हजार ४१० कोरोना रुग्ण असून ३ हजार ८४४ जणांचे मृत्यू झाले आहेत. ३४ हजार ५७६ जण कोविडमुक्त झाले आहेत, तर २९ हजार ९८२ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात मंगळवारी दिवसभरात १ हजार ९२५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ६९,६३१ जण कोविडमुक्त झाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button