दि.२६ जून २०२० रोजी खा.पूनम महाजन ऑनलाईन कार्यक्रमात रत्नागिरीकरांशी संवाद साधणार

संपूर्ण भारतभर नरेंद्र मोदी यांच्या शासनाला १ वर्ष पूर्ण झाले आहे त्या निमित्याने संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुका प्रत्येक शहरामध्ये भा.ज.पा चे राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेते संवाद साधत आहेत. प्रत्येक मंडलातून नाव व मोबाईल नंबर प्रदेशाला संकलित करून त्या क्रमांकावर लिंक पाठवून संवाद कार्यक्रम होत आहे.
रत्नागिरी तालुक्यामध्ये दि.२६ जून २०२० रोजी सायंकाळी ६.०० वा.भा.ज.पा युवा मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा.पूनम महाजन ह्या ऑनलाईन सिस्को वेबेक्स मिटिंग अॅपच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. रत्नागिरी शहर तालुक्यामधून २०० व्यक्तींजवळ हा संवाद साधला जाणार आहे. मोदी शासनाच्या शासन काळातील प्रमुख निर्णय आणि अंमलबजावणी याबाबत अहपोह केला जाईल. खा.पूनम महाजन या संवाद कार्यक्रमात सहभागी होत असल्याने भा.ज.पा प्रेमी मध्ये खूप उत्साह आहे. सदर कार्यक्रमामध्ये निमंत्रितांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
संवाद कार्यक्रमात दि.२६ जून २०२० रोजी सायंकाळी ४.०० वा.माजी आमदार मेघाताई कुलकर्णी ह्या राजापूर वासियांशी तर अतुल काळसेकर लांजा तालुक्यात तर संगमेश्वर येथे रघुनाथजी कुलकर्णी हे संवाद साधणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button