
शासनाने कोणत्याही नव्या कामांचे प्रस्ताव सादर करू नयेत,अशा सूचना दिल्याने जिल्ह्यातील विकासकामांना फटका
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषद स्तर, जिल्हा नियोजन, राज्य स्तर, केंद्र स्तरावरून मोठ्या प्रमाणात निधी येत असतो. या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच खासदार व आमदार निधीतून गावोगावी विकासकामे करण्यात येत असतात.सर्वत्रच कोरोनाने हाहाःकार घातला आहे. त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील विकासकामांना बसला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विकासकामे थांबणार आहेत शासनाने कोणत्याही नव्या कामांचे प्रस्ताव सादर करू नयेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना खीळ बसली आहे.
www.konkantoday.com