शुक्रवारी नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्राची चिंता आता आणखीनच वाढली आहे. कारण, शुक्रवारी नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. आज महाराष्ट्रात ३,८२७ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १४२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १,२४,३३१ इतका झाला आहे. यापैकी ५५,६५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ६२,७७३ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ५०.४९ टक्के इतका झाला आहे तर राज्यातील मृत्यू दर हा ४.७४ टक्के असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button