भुईबावडा घाट पावसाळ्यात वाहतूकीस धोकादायक
कोल्हापूरला सिंधुदुर्गशी जोडणारा आणि कोकणातील प्रमुख घाटांपैकी दुवा मानला जाणारा घाट रस्ता म्हणजे भुईबावडा. मात्र संबंधित विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने या घाट रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. घाटात कधीही धोकादायक दरडी कोसळण्याची दाट संभवना आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग घाटमार्गाच्या देखभाल दुरूस्ती करण्याऐवजी पडलेल्या दरडी हटविण्यातच धन्यता मानत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रमुख चार घाट मार्ग आहेत. भुईबावडा, करुळ, आंबोली व फोंडाघाट यापैकी भुईबावडा व करुळ हे दोन घाटमार्ग पावसाळ्यात ‘डेंजरझोन’ बनतात. विशेषतः भुईबावडा घाट तर पावसाळ्यात वाहतूकीस धोकादायक बनतो.पावसाळा सुरू झाला की, भुईबावडा घाटात दरडी कोसळण्याच्या मालिका सुरू होतात.
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याकडे गांभिर्याने लक्ष घालणे जरुरीचे आहे
www.konkantoday.com