जैतापूर येथील पत्रकार सचिन नारकर यांच्या मृत्यूचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे
राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील पत्रकार सचिन नारकर यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूला तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यांच्या मृत्यूबाबत अद्याप कोणताही छडा न लागल्याने आता त्यांच्या मृत्यूचा तपास नाटे पोलिसांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रत्नागिरीकडे देण्यात आला आहे.
जैतापूर येथील पत्रकार सचिन नारकर यांचा झालेला अपघाती मृत्यू बाबत अद्याप उलट सुलट चर्चा सुरू आहेत. नारकर यांच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता.
www.konkantoday.com