बरे होण्याचे प्रमाण 57 टक्के एकूण पॉझिटिव्ह 370 ॲक्टीव्ह 144

रत्नागिरी – आज दिवसभरात 16 रुग्ण बरे होवून गेल्याने जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 211 झाली आहे.  बरे झालेल्यांची टक्केवारी 57 टक्के झाली आहे.  दरम्यान आज 2 पॉझिटिव्ह अहवाल आले (रत्नागिरी 1, लांजा 1) त्यामुळे पॉझिटिव्हची संख्या 370 झाली आहे.दरम्यान संगमेश्वर तालुक्यातील बेलारी गावातील 85 वर्षे वृध्दाचा आज जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला त्यामुळे मृतांची संख्या 15 झाली आता एकूण ॲक्टीव्ह रुग्ण 144 आहेत.आज घरी सोडण्यात आलेल्या 16 जणांमध्ये जिल्हा रुग्णालयामार्फत 5, लांजा येथील 2, सावर्डा येथील 5 आणि कोविड केअर सेंटर समाजकल्याण रत्नागिरी येथील 4 रुग्ण आहेत. 
 

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन 67
            जिल्ह्यात सध्या 66 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 9 गावांमध्ये,  गुहागर तालुक्यामध्ये 5 गावांमध्ये, खेड तालुक्यात 06 गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात 07 गावांमध्ये,  दापोली मध्ये 9 गावांमध्ये,लांजा तालुक्यात 6 गावांमध्ये, चिपळूण तालुक्यात 14  गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 10 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
 
संस्थात्मक विलगीकरण
            संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी –  29, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी –  11, उपजिल्हा रुग्णालय कामथे – 9, उपजिल्हा रुग्णालय कळबणी -3, कोव्हीड केअर सेंटर घरडा इन्स्टीटयुट, लवेल, खेड –  15, ग्रामीण रुग्णालय गुहागर- 2, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर – 1,  कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – 4, ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर-2  असे एकूण 76 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.  
होम क्वारंटाईनची संख्या 5000 ने कमी झाली
          मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून  आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 58 हजार 550   इतकी आहे.
 
आत्तापर्यंत 6 हजारांहून अधिक अहवाल निगेटिव्ह
            जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 7 हजार 63 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 6 हजार 595 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 370 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 6 हजार 203 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 468 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 468 प्रलंबित अहवालमध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे, 425 अहवाल मिरज आणि 39 अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.  
            परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि.  09 जुन 2020 अखेर एकूण 1 लाख 27 हजार 659 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 55 हजार 822 आहे. यामध्ये रेल्वेने इतर राज्यात अथवा जिल्हयात गेलेल्यांची संख्या 10 हजार 289 आहे.
            परप्रांतातून आलेल्या आणि जिल्हयात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्हयात 63  निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. यात 22 जणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button