
निसर्ग चक्रीवादळाचा पक्षांना देखील फटका, रत्नागिरी परीसरात अनेक पक्षी जखमी
निसर्ग चक्रीवादळाने कोकणात थैमान घालत जनजीवन विस्कळीत केलेच परंतु याचा पक्ष्यांवर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.आकाशात मुक्त संचार करणाऱ्या पक्ष्यांना मोठा फटका बसला आहे.रत्नागिरी परिसरात ३५ ब्लॅक काइट घारी,१ सी बर्ड,२बुश त्ररश(Bush Trush),1 रेड काइट हे पक्षी जखमी अवस्थेत सापडले. रत्नागिरीतील भाटये परिसरात २९ ब्लॅक काइट घारी व १ रेड काइट घार जखमी अवस्थेत जमिनीवर पडल्याचे निदर्शनास आले.तसेच मिऱया परिसरात ६ ब्लॅक काइट घार,
१ सी बर्ड,२बुश त्ररश(Bush Trush) हे पक्षी जखमी अवस्थेत होते.वाईल्ड लाईफ सर्वायवर महाराष्ट्र (wild life survivor maharashtra) व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना रेस्क्यू करण्यात आले व त्यांच्यावर उपचार करण्यात आले.त्यानंतर काही पक्षी उडण्यास सक्षम झाल्यावर ते उडून गेले.निसर्ग चक्रीवादळाचा फटका माणसांबरोबर पक्ष्यांनाही बसला आहे.परंतु अशा आपत्तीच्या काळातही पक्षीप्रेमी धावून आल्याने त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.
www.konkantoday.com
