वातावरण बदलामुळे* *अवघी जीवसृष्टीच धोक्यात*- *माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंची खंत*

वातावरण बदलामुळे अवघी जीवसृष्टीच धोक्यात आली असून, ती आयसीयू (अतिदक्षता विभाग) मध्ये आहे असेच वाटत आहे. त्यामुळे त्यावर हरित तंत्रज्ञान हाच प्रभावी पर्याय आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.गोखले इंस्टिट्यूटच्या वतीने आयोजित प्रा. पी. आर. दुभाषी यांच्या स्मृतीनिमित्ताने व्याख्यानात गुरुवारी सुरेश प्रभू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरु डॉ. अजित रानडे यांची उपस्थिती होती. प्रभू म्हणाले, सर्व जग क्लायमेट चेंजमुळे प्रभावित झाले आहे. जगाचे तापमान आणखी 1.5 ते 2 अंशांने वाढण्याच्या दिशेने जात आहे. तसेच झाले तर अवघी जीवसृष्टीच धोक्यात येईल. त्यावर हरित इंधन हाच पर्याय आहे.त्याचा वापर भारताने करायला हवा असेही ते म्हणालेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button