लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४,४०,६९६ पास
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४,४०,६९६ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले आहेत. तसेच ५,९२,५८० व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे
राज्यात लॉकडाऊनच्या दरम्यान म्हणजे २२ मार्च ते ३१ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १,२१,०७५गुन्हे नोंद झाले असून २३,६४१ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ६कोटी ११ लाख ९३ हजार ८४८ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.
www.konkantoday.com