
अखेर नामदार उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न मार्गी लागला
रत्नागिरी शासकीय रुग्णालयांत कोरोनाने मुळे मृत झालेल्या व्यक्तीचे अंत्यविधी रनागिरी येथील चर्मालय येथील स्मशान भूमीत होण्यास मान्यता देण्यात आली. याबाबत नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी व स्वच्छता सभापती राजन शेट्ये यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.गेले काही दिवस कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारा बाबत प्रश्न निर्माण झाला होता.रत्नागिरी येथील चर्मालय जवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता.या सर्वांमुळे प्रशासनासमोर पेच वाढला होता त्यामुळे रत्नागिरी शासकीय रूग्णालयात काेराेनामुळे मृत झालेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार त्याच्या गावात करण्यात आला होता. तेथेही काही प्रमाणात विरोध सुरू झाला होता.शेवटी या प्रकरणात उच्चतंत्र शिक्षणमंत्री नामदार उदय सामंत यांनी लक्ष घातले व त्यांनी या विषयाला न्याय मिळवून दिला.भाजपचे दक्षिणचे अध्यक्ष दीपक पटवर्धन व अन्य अनेकांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवले होते व या प्रश्नाबाबत मार्ग काढण्याचे आवाहन केले होते.याबाबत प्रशासन पातळीवर प्रयत्न सुरू होते परंतु त्यातून मार्ग निघाला नव्हता शेवटी आज नामदार सामंत यांनी पुढाकार घेऊन याविषयी बैठक बोलावली.
आज झालेल्या बेठकीत ना उदय सामंत ,नगराध्यक्ष बंड्या साळवी आरोग्य सभापती व ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांनी निर्णय घेऊन चर्मालय येथील स्म्शान भूमीत कोरोना बाधित रुग्णाचा अंत्यविधी करण्याचा निर्णय जाहीर केला.
याबाबत बोलताना नगराध्यक्ष बंडया साळवी म्हणाले की या काेराेनामुळे मृत झालेल्या रुग्णाचा अंत्यविधी झाला की सलग तीन दिवस निर्जंतुकीकरण केले जाणार आहे आणि या साठी स्मशानभूमीत वेगळे स्टॅन्ड व वेगळी व्यवस्था ठेवण्यात येणार असून माणुसकीच्या भावनेतून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यानी स्पष्ट केले
www.konkantoday.com