एमआयडीसी विभागाकडून मिरजोळे विभागातील ३ कोटी २० लाखांच्या रस्त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी निधी दिला


रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे जिल्हा परिषद गटाच्या विकासकामासाठी प्रथमच एमआयडीसी विभागाकडून मिरजोळे विभागातील ३ कोटी २० लाखांच्या रस्त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी निधी दिला.त्यामुळे मिरजोळे ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते आता गुळगुळीत होणार आहेत. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले.

मिरजोळे जिल्हा परिषद गटातील हजारो ग्रामस्थांनी भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. पालकमंत्री सामंत यांचे ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत केले. मिरजोळे हद्दीत एमआयडीसी विभागातून रस्ते होणे हा ऐतिहासिक दिवस असून, सुमारे ३ कोटी २० लाखाची रस्त्यांची कामे होत आहेत.

विकासकामातून येथील परिसराचा कायापालट करण्यासाठी मिरजोळेवासियांनी मला साथ द्या, अशी भावनिक साथ पालकमंत्री सामंत यांनी दिली. हेवेदेवे बाजूला सोडून गावविकासासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. मिरजोळे गावाच्या विकासकामांसाठी भविष्यात एकही रुपया निधी कमी पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख बाबू म्हाप, उपतालुकाप्रमुख भिकाजी गावडे, युवा सेना तालुकाप्रमुख तुषार साळवी, मिरजोळे सरपंच गजानन गुरव, युवासेना उपतालुकाप्रमुख संदीप नाखरेकर, हर्षराज पाटील, शरदशेठ पाटील, प्रवीण पवार, तालुका संघटक राजू तोडणकर, दांडेअडोम सरपंच कैलास तांबे, सरपंच फैयाज मुकादम, खेडशी सरपंच घाणेकर, ग्रामपंचायत उपसरपंच श्वेताली पाटील, रत्नदीप पाटील, राहुल पवार, विनायक गावकर यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button