
काजूची रोपे शासनाने खरेदी करून शेतकरी, बचत गट अथवा वनविभागाला लागवडीसाठी देण्याची मागणी
काजूची रोपे शेतकऱ्यांनी खरेदी केली नाही, तर ही रोपे जशीच्या तशी रोपवाटिकांमधून पडून राहतील. त्यातून रोपवाटिका मालकांचे नुकसान होईल. ही रोपे शासनाने खरेदी करून शेतकरी, बचत गट अथवा वनविभागाला लागवडीसाठी दिल्यास फायदा होईल, अशी मागणी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले यांनी कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने काजू लागवड मोठ्याप्रमाणावर केली जाते. त्यासाठी काजूची रोपे ही रोपवाटिका यांच्या माध्यमातून खरेदी केली जातात. सध्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर काजूची रोपे उपलब्ध आहेत.
www.konkantoday.com
Beardhood Hand Cleaner Sanitizer Gel, FDA Approved With 70% Isopropyl Alcohol and Aloevera, Refill Pack (5 Liters)



