
रत्नागिरी शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणार, शहरात प्रधानमंत्री आवासमधून १ हजार घरे उभारणार.
रत्नागिरी शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येणार असून १ हजार घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधण्यात येणार आहेत. साळवी स्टॉप येथील सावंत यांच्या जागेवर हा प्रकल्प उभा करण्याचा संकल्प आहे. तसेच जिल्ह्यात आवास योजनेची ३३ घरे बांधून पूर्ण केली जातील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.मंत्री उदय सामंत यांनी रविवारी दृकश्राव्य माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. शहरातील झोपडपट्टीधारकांची सुमारे ८०० घरे असून त्यांना चांगली घरे देण्याचा शासनाचा विचार आहे. त्यासाठी शहरातील साळवी स्टॉप येथील सावंत यांच्या जागेमध्ये १ हजार घरांची उभारणी प्रधानमंत्री आवास योजनेतून केली जाणार आहे. रत्नागिरी शहर हे झोपडपट्ठीमुक्त करण्यात येणार आहे. तसेच शहरालगतच्या गावामध्ये घनकचरा प्रकल्पही लवकरच उभारले जातील, असे सामंत यांनी यावेळी सांगितले.www.konkantoday.com