खरीप भात लागवडीबद्दल, व कोरोनाच्या अनुषंगाने शेती करताना घायची काळजी या विषयी मार्गदर्शन

सिंधुदुर्ग-खरीप भात लागवडीच्या अनुषंगाने करोना पार्शवभूमीवर भात शेतीचे नियोजन कसे करावे यासाठी भात संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरी (डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत ) , कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस , सिंधुदुर्ग व रिलायंस फाउंडेशनने यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गातील मालवण, वेंगुर्ला , कुडाळ तालुक्यातील भात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञांनाच्या ध्वनी चर्चा सत्राद्वारे घरबसल्या मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये भात संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरी चे प्रभारी अधिकारी डॉ. भरत वाघमोडे यांनी तज्ञ् मार्गदर्शक म्हणून शेतकऱ्यांना भात लागवडीविषयी मार्गदर्शन केले. यावेळेस डॉ. भरत वाघमोडे यांनी शेतकऱ्यांना भात लागवडीसाठी जमिनीची मशागत कशी करावी, आपल्या प्रभागांनुसार वाणाची निवड कशी करावी , विविध भात वाणाची लागवड कालावधी व त्याची योग्य नियोजन, भात लागवडीच्या विविध शास्त्रीय पद्धती , भात लागवडीनंतरचे नियोजन , खत व्यवस्थापन , रोपवाटिका नियोजन , भात संशोधन केंद्रा मार्फत विकसित केलेल्या विविध भाताच्या वाणाची माहिती शेतकऱ्यांना करून दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर भात लागवड करताना शाररिक अंतर (Physical Distancing ) कसे राखावे, शेतातून काम करताना व करून आल्यावर आपली वयक्तीक स्वछता कशी राखावी याची माहिती कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस मालवण सिंधुदुर्गचे कृषी विस्तार तज्ञ् डॉ. विलास सावंत यांनी शेतकऱ्यांना केली . त्याच प्रमाणे रिलायन्स फाउंडेशनचे कृषी तज्ञ् श्री सचिन मताले यांनी शासनाच्या विविध योजनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे व्यवस्थापन रिलायन्स फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक श्री राजेश कांबळे, यांनी केले तसेच कार्यक्रमाची तांत्रीक बाजू रिलायन्स फाउंडेशनचे धम्मदीप गोंडाणे व नियोजन श्री. गणपत गावडे यांनी केले. कार्यक्रमाला शेतऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button