मंत्री उदय सामंत यांच्या खर्चातून, जिल्हयात सरपंचांना विमा संरक्षण

जिल्हयात कोव्हीड  19 चा मुकाबला करण्यात ग्रामस्तरावर सरपंचांचा मोलाचा वाटा आहे. या सरपंचांसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वखर्चाने विमासंरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.राज्याचा अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. कोरोनाचया पार्श्वभूमीवर  मोठया प्रमाणावर चाकरमानी जिल्हयात दाखल झाले आहेत, या सर्वाना होम क्वांरटाईन करण्यात आलेले आहे. या सर्वांची काळजी ग्रामस्तरावर ग्राम कृती दलावर आहे. या कोरोना विरुध्दच्या लढयात सरपंचांची कामगिरी अतिशय मोलाची आहे. याच जाणिवेतून या सर्वांना आपण स्वखर्चाने विमा संरक्षण देणार असल्याचे श्री उदय सामंत यांनी कळविले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button