भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा मोठा धोका

पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हे चक्रीवादळ पुढच्या सहा तासांत रौद्र रुप धारण करण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा प्रभाव साधारण चार दिवस राहील. त्यामुळे मान्सून केरळला १ जूनला आणि राज्यात ७ जूनला वेळेवर दाखल होईल, अशी माहिती कृषी हवामान अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली चक्रीवादळाचा प्रभाव साधारणत: चार ते पाच दिवस असेल.. या वेगानं मान्सून पुढे सरकणार आहे. त्यामुळे साधारण ७ जून रोजी मान्सूनचं केरळला आगमन होईल. तर राज्यात ७जूनला आगमन होईल, असं रामचंद्र साबळे यांनी सांगितलं.दरम्यान अम्फान चक्रीवादळ संध्याकाळी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी १८५ किमी वाहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृह मंत्रालय आणि आपत्ती निवारणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button