तुम्हाला तुमच्या गावात आणण्यात मी यशस्वी झालो. याचे मला समाधान आहे- आमदार भास्कर जाधव
तुम्हाला तुमच्या गावात आणण्यात मी यशस्वी झालो. याचे मला समाधान आहे. गाव तुमचे, गावातील माणसेही तुमची. पण क्वारंटाईन व्हा नंतर गावात जा. हे तुमच्या आणि गावच्या सुरक्षेसाठी गरजेचे आहे. असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरात येणार्या चाकरमान्यांना मार्गताम्हाने येथील चेकपोस्टवर केले.
चेकपोस्टवरील शासकीय कर्मचारी आणि चाकरमान्यांची कोणतीही गैरसुविधा होणार नाही याची काळजी आमदार जाधव यांनी घेतली. चाकरमान्यांचे स्वागत करताना त्यांना बाटलीबंद पाणीही पुरविले.
कोकणातील चाकरमान्यांना त्यांच्या गावात जाण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी सुरवातीपासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
www.konkantoday.com