
राजधानी एक्सप्रेसमधुन ३०० ते ४०० हून अधिक चाकरमांनी रत्नागिरी स्थानकात उतरले
केंद्राने विविध राज्यात जाण्याकरिता काही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता.त्याप्रमाणे मडगावकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस आज रत्नागिरी स्थानकात १०.४० मिनिटाने दाखल झाली.या गाडीला रत्नागिरी स्थानकावर तांत्रिक कारणाकरिता काही मिनिटांचा थांबा होता. त्यावेळी रत्नागिरी स्थानकात ३०० ते ४०० लोकं उतरल्याची माहिती उपलब्ध होत आहे. उतरलेल्या लोकांची मात्र रितसर अर्ज भरून माहिती व तपासणी करण्यात येत आहे.या प्रवाशांनी मडगावपर्यंत तिकीट काढून रत्नागिरीत उतरले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.उद्याही एक ट्रेन नवी दिल्ली येथून मडगावला जाणार आहे.या ट्रेनला रत्नागिरी स्थानकात अधिकृत थांबा आहे.
www.konkantoday.com

