
कोकण रेल्वेची वाहतूक हळुहळू पुर्ववत
रत्नागिरी ः मुंबईत गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते. त्याचा परिणाम कोकण रेल्वे वाहतुकीवर झाला होता. काल मुंबईतून सुटणार्या कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र आता या मार्गावरील गाड्या हळुहळू पुर्ववत होत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या आज वेळेत धावत होत्या. मात्र तुतारी एक्स्प्रेस व अन्य काही गाड्यांचे वेळापत्रक अद्यापही काही प्रमाणात कोलमडले आहे.