
१२ मेपासून रेल्वे १५ पॅसेंजर ट्रेन चालवणार
१२ मेपासून रेल्वे १५ पॅसेंजर ट्रेन चालवणार आहे. या पॅसेंजर ट्रेन जोडीने चालवण्यात येतील. (return journeys) यानुसार या ट्रेनच्या एकूण ३० फेऱ्या होतील. या गाड्या डिब्रुगढ, अगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपूरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमबादाबाद आणि जम्मू तवीला जाणाऱ्या आहेत. नवी दिल्लीवरून विशेष ट्रेनच्या स्वरूपात या गाड्या चालवल्या जातील.
फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिलीय. आज संध्याकाळपासून रेल्वेचे आरक्षण सुरू होईल
www.konkantoday.com