दीड दिवसांच्या गणरायांना भक्तिभावाने निरोप; गणेशघाटावर गणेशभक्तांची गर्दी

खेड : घरी आलेल्या बाप्पांची मनोभावे सेवा करून आज दीड दिवसांच्या गणरायांना भक्तिभावाने निरोप दिला. विसर्जन घाटावर बाप्पाना निरोप देण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. रात्री उशिरा पर्यंत जगबुडी, आणि नारिंगी नदी किनारी विर्सजन सोहळा सुरु होता. विसर्जनादरमायन कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खेड पोलिसांनी गणेश घाटांवर चोख बंदोबस्त ठेवला होता.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी ,लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा गगनभेदी घोषणा देत सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गणरायांच्या विसर्जन मिरवणूका निघाल्या, ढोल ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत गणरायांच्या विसर्जनाच्या मिरवणुका गणेश घाटाकडे सरकत होत्या. विसर्जन मिरणुकीत सहभागी झालेले गणेशभक्त बेधुंद होऊन नाचत होते. मध्येच गंऱ्यांवर पुष्पवृष्टी केली जात होती.

गेली दोन वर्ष गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने गणरायांच्या विसर्जन मुरवणूक काढता आल्या नव्हता त्यामुळे भक्तांना गणरायाला लवकरच येणाची विनवणी करत बेधुंद होऊन नाचता आले नव्हते मात्र यावर्षीचा गणेशोत्सव निर्बंध मुक्त असल्याने भक्तांमध्ये कमालीचा उत्साह आहे. आजच्या विसर्जन मिरवणुकीत हा उत्साह प्रकर्षाने पाहावयास मिळत होता.

जगबुडी आणि नारिंगी नदीच्या विसर्जन घाटावर नगरपालिका प्रसाशनानें विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांची आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. विसर्नाजदरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जीवन रक्षक तैनात करण्यात आले होते. विसर्जन घाटावर विजेचे प्रखर दिवेही लावण्यात आले होते. विसर्जनादरम्यान कायदा व सुव्यस्था अबाधित रहावी यासाठी खेड पोलिसानी चोख बंदोबस्त ठेवला होता
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button