राष्ट्रीय महामार्गाकडून आता धोकादायक भागात गस्त घालण्याचे आदेश

रत्नागिरी ः कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा या महामार्गावर अनेक ठिकाणी दरडी रस्त्यावर येण्याचे तसेच आजुबाजूची माती रस्त्यावर येण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने अपघात होवू नये यासाठी आता राष्ट्रीय महामार्ग विभाग सज्ज झाला असून या मार्गावरील जे धोकादायक भाग आहेत त्यासाठी २४ तास गस्त घालावी अशा सूचना राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता विनयकुमार देशपांडे यांनी दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी परशुराम घाटात दरड कोसळल्यानंतर मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला होता. आता अशा धोकादायक ठिकणी कडेला बॅरेगेटस् लावून वाहन चालकांना सतर्क करण्यात येत आहे. वाहन चालकांनी देखील आता या मार्गावरून वाहतूक करताना सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button