मुंबईतील चाकरमान्यांना आणण्याबाबत अजूनही ठोस निर्णय नाही ,संभ्रमाचे वातावरण

मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात गावाकडे परतण्याबाबत अद्यापही ठोस निर्णय जाहीर झालेला नाही एके ठिकाणी प्रशासन येणाऱ्या चाकरमान्यांना कोरं टाईन करण्याच्या दृष्टीने शाळा ,कॉलेजेस ताब्यात घेण्याची तयारी करीत आहे .चाकरमान्यांना परत येण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरा व त्यामध्ये घातलेल्या अटी पूर्ण करावेत असे सांगण्यात येत आहे कोकणातील चाकरमानी मुख्यत्वे करून मुंबई पुणा येथे आहेतव त्या ठिकाणी सध्या रेड झोन आहे केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे रेडझोनमधील कुणालाही बाहेर जाता येणार नाही किंवा रेड झोनमध्ये येता येणार नाही असे म्हटले आहे त्यामुळे राज्य शासनाने ठोस निर्णय घेऊन चाकरमान्यांना बाबतचा निर्णय जाहीर करणे आवश्यक आहे .असे होत नसल्याने चाकरमान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी आज सिंधुदुर्गात बोलताना केंद्र शासनाकडून काय निर्णय घेण्यात आला हे अद्याप निश्चित झालेले नाही आज संध्याकाळपर्यंत निर्णय स्पष्ट होईल त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले आहे एकूणच कोकणात येणाऱया चाकरमान्यांना नेमक्या सूचना मिळत नसल्याने त्यांच्यात संभ्रमाअवस्था आहे
www.konkntoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button