
नाशिक येथे अडकून पडलेले उत्तर प्रदेशातील कामगार विशेष रेल्वे गाडीने रवाना
नाशिक येथे अडकून पडलेल्या मध्य प्रदेशातील कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी काल विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली होती. त्यानंतर आज उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे जाण्यासाठी दुसरी रेल्वे गाडी रवाना झाली.
नाशिक येथे कामानिमित्त वास्तव्याला असलेल्या साडेआठशे नागरिकांना घेऊन ही गाडी निघाली आहे. जाताना गाडीत त्यांना खाण्यापिण्याचं साहित्यही पुरवण्यात आलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि जेवण तसेच बिस्किटं असे पदार्थ त्यांना प्रशासनाने सोबत दिले आहेत.
नाशिक रोडच्या रेल्वे स्थानकातून ही विशेष रेल्वे सुटल्यानंतर या उत्तर प्रदेशातील मंडळींनी ‘जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकार जिंदाबाद’ अशा घाेषणा दिल्या
www.konkantoday.com