चाकरमान्यांच्या मदतीसाठी कोकणातील गावकरी धावले
कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईकरांची स्थिती बिकट झाली असून जगणेही मुश्किल झाले आहे. अशा स्थितीमध्ये मुंबईकर चाकरमान्यांच्या मदतीसाठी कोकणातील गावकरी धावून आले आहेत. राजापुर तालुक्यातील ओणी कोंडीवळे येथील श्रीदेव विमलेश्वर उत्कर्ष मंडळ, मुंबई, ओणी-कोंडीवळेच्या स्थानिक ग्रामस्थांनी घराघरातून धान्य गोळा करून मुंबईकरांसाठी सुमारे तीन टन धान्य उपलब्ध करून दिले आहे.चाकरमन्यांची उपासमार होवू नये या उद्देशाने स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना धान्य देण्याचे निश्चित केले. त्याला काही मुंबईकरांनीही सहकरार्य केले. त्याप्रमाणे घराघरातून धान्य गोळा करत त्याची स्वतंत्र पाकिटे तयार केली. गावाकडून मुंबईला धान्याची गाडी नेण्यासाठी प्रशासकीय परवानगीची अडचण होती. ग्रामपंचायत भेटीच्यावेळी त्याबाबत आमदार राजन साळवी यांना माहिती समजताच त्यांनी जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून सोडविली. त्यामुळे तोही प्रश्न सुटून गावाकडून धान्याची सुमारे साडेचारशे पाकीटांची गाडी मुंबईकरांसाठी नुकतीच गावावरून रवाना झाली
www.konkantoday.com