
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना झाल्यानंतरच या परीक्षांवर निर्णय-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा कधी होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षेविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना झाल्यानंतरच या परीक्षांवर निर्णय घेण्यात येईल, असं सामंत यांनी स्पष्ट केलं. तसेच विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहनही केलं. ते आज सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.उदय सामंत म्हणाले, ‘विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात समिती नेमली आहे. आयोगाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच समितीच्या अहवालावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल. सर्व विद्यापीठांची आपापल्या पातळीवर परीक्षा घेण्याची तयारी झालेली आहे. ऑनलाईन अध्यापन सध्या सुरु आहे. ऑनलाईन परीक्षासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी माहिती दिली जाईल. तसेच परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल.’
www.konkantoday.com